tag:blogger.com,1999:blog-11566475717875180902024-03-05T09:49:57.079+05:30माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!जी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger93125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-76678770792722605312012-07-02T09:19:00.000+05:302012-07-02T09:19:00.297+05:30एका दगडात तीन पक्षी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
'काय बोचते मज समजेना ह्दयाच्या अंतर्हदयाला' अशी कालवाकालव ह्दयात सुरु झाली की किल्लेप्रेमीला समजून चुकतं की एखाद्या किल्ल्याला भेट देऊन त्याला बरेच दिवस झाले आहेत आणि दारू न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या दारूड्याला जशी फक्त दारूच स्वस्थता देऊ शकते तशीच त्याच्या जीवालाही सह्याद्रीची ती ताजी हवाच स्वस्थता देऊ शकते. आमची अवस्था अगदी अशीच होती. मागचा किल्ला पाहून बरेच दिवस झाले होते. (बरेच म्हणजे जरा जास्तच - मला तर वाटतं किल्ल्यावर जाऊन आलो त्याला निदान एक वर्षं तरी झालं असावं.) तेव्हा किल्ला पहावा आणि पावसात भिजता आलं तर तेही काम साधून घ्यावं असं ठरलं आणि किल्लेमोहिमेची आखणी सुरू झाली.<br />
<br />
किल्ल्यावर जायचं ठरल्यावर किल्ल्याचा शोध सुरू झाला. अनेक किल्ले पहायचे राहिले असताना पाहिलेले किल्ले पुन्हा पाहण्यात काहीच हशील नसल्यामुळे मी ट्रेकक्षितिज उघडलं आणि जिल्ह्यानुसार किल्ल्यांची यादी पहायला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातले जवळपास किल्ले पाहून झाले असल्यानं मी सातारा, नगर अशा जवळपासच्या जिल्ह्यांकडे नजर टाकल्यावर सातारा जिल्ह्यात वर्धनगड आणि महिमानगड असे दोन किल्ले दिसले. हे दोन किल्ले एका दिवसात सहज करता येतात अशी उत्साहवर्धक माहिती लेखकाने स्वत: सांगितली असल्यावर मग काय? रविवारी हेच दोन किल्ले करायचे ठरले. चतुर्भुज झाल्यामुळे आमच्या कित्येक मित्रांनी 'एक व्यक्ती एक पद' या धोरणाला अनुसरून नवरा किंवा मित्र यापैकी नवरा हे पद स्वीकारून आमच्या मैत्रीचा राजीनामा दिला असल्याने मामेभावाला फोन लावला. तो तयार होताच, तेव्हा रविवारची मोहीम नक्की झाली.<br />
<br />
रविवारी उठून आवरलं, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट, कॅमेरा, खायच्या एकदोन वस्तू सॅकमधे टाकल्या आणि गाडीला किक मारून पुणे सातारा महामार्ग गाठला. हवा कुंद होती आणि रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. आकाशात ढगांची गर्दी, हवेत किंचित गारवा आणि समोर मोकळा रस्ता असे ते 'दुनिया गयी भाड मे' असं वाटायला लावणारे धुंद वातावरण होते. ८०, १०० तर कधी चक्क १२० च्या वेगाने वा-याशी स्पर्धा करत (का त्याला टक्कर देत) मी पुढेपुढे चाललो होतो. आयुष्यात मला भेटलेल्या सगळ्या खलनायकांना मी त्या दोन तासांत माफ करून टाकले. एवढेच काय, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला थांबवून काश्मीर जरी मागितले असते तर तेही मी त्यांना (वर गुजरातची भर घालून) अगदी हसतहसत देऊन टाकले असते.<br />
<br />
दोन तासात मी सातारला पोचलो आणि सातारा पंढरपूर रस्त्यावरच असलेल्या सातारा रेल्वे स्टेशनवरून भावाला उचलून त्याच रस्त्याने पुढे पंढरपूरकडे कूच केले. वर्धनगड किल्ला याच रस्त्यावर साधारण २५ किमी अंतरावर आहे. एके ठिकाणी गरमागरम चहा मारून अर्ध्या पाऊण तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावात पोचलो. एका दुकानाशेजारी गाडी लावून आम्ही आमची शिरस्त्राणे दुकानदाराकडे दिली आणि गडावर निघालो. खालून तरी गड फारसा अवघड वाटत नव्हता. पण दिसते तसे नसते हे रोहिड्याच्या (विचित्रगड) अनुभवातून आम्हाला कळून चुकले होते. सुदैवाने वर्धनगडाबाबत तसे झाले नाही. फक्त अर्ध्याच तासात आम्ही वर पोचलो. प्रत्यक्ष किल्ल्यावर एका देवीचे मंदिर वगळता पहाण्यासारखे विशेष काही नाही. पण किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे ती त्याची तटबंदी. ती अजूनही उत्तम स्थितीत आहे. मजबूत भरपूर उंच असलेली ही तटबंदी एकावेळी चार माणसे चालतील एवढी रूंद आहे. आम्ही तिच्यावरूनच किल्ल्याला एक वेढा घातला आणि देवीच्या मंदिरात जाऊन थोडी क्षुधाशांती केली. गडावर वारा मोठा भन्नाट सुटला होता आणि त्या तुलनेत देवीच्या मंदिरातले वातावरण फारच उबदार वाटत होते. त्यामुळे तिथून पाय निघत नसतानाही (नाईलाजाने) आम्ही निघालो आणि गड उतरायला सुरूवात केली. सुमारे पंधरा मिनिटांतच आम्ही खाली पोचलो. आमच्या वस्तू घेतल्या, सगळा जामानिमा चढवला आणि आमच्या पुढच्या उद्दिष्टाकडे अर्थात महिमानगडाकडे प्रस्थान केले.<br />
<br />
वर्धनगड हा अगदी सातारा-पंढरपूर रस्त्यावरच असला तरी महिमानगड मात्र रस्त्यापासून थोडासा आत आहे. रस्ता सोडून आपण डावीकडे वळलो की साधारण अर्धा किलोमीटरवर महिमानगड गाव आहे. आम्ही पोचलो तेव्हा रविवार, त्यात दुपारची वेळ असल्याने गावात अगदी सामसूम होती. महिमानगडही वर्धनगडासारखाच मध्यम उंचीचा गड आहे. गड चढायला सुरूवात केली आणि पंधरा मिनिटांत आम्ही वर पोचलोही. गडाचा महादरवाजा आता ढासळला असला तरी त्यात कातलेले दोन गजराज आजही पाहुण्यांचे स्वागत करायला हजर आहेत. गडावर एक मारूतीचे लहानसेच पण देखणे मंदिर आहे. (एका सुबक दगडी मुर्तीची प्रतिष्ठापणा करायची आणि मग पुन्हा तिला शेंदूर फासून तिचे सुंदर रूप नष्ट करायचे हा प्रकार मारूतीच्या बाबतीत का घडतो हा प्रश्न मला नेहमी पडतो!) मारूतीच्या देवळासमोर कुणी भाविकाने फरशी टाकली आहे, तिथे आम्ही बसलो. थोडे खाल्ले आणि चक्क आडवे झालो. (झोप हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक किल्ल्यावर करतोच.) वर आकाशाकडे बघत असा झोपलो की मी एकदम तत्वज्ञाच्या भूमिकेत जातो. आत्तापर्यंत आयुष्यात आपण काय साध्य केले, आणि पुढे काय करणे बाकी आहे याचा हिशोब होतो. आपल्याला जे आवडते ते आपण करतो आहोत का, आयुष्य जसे जगायचे आहे तसे ते आपण जगतो आहोत का असे अवघड प्रश्न स्वत:ला विचारले जातात. (दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नेहमीच नकारार्थी येतात!) असे चिंतन झाले, थोडी झोप झाली आणि मग आम्ही खाली निघालो.<br />
<br />
पायथ्याशी पोचलो तेव्हा फक्त अडीच वाजले होते. इतक्या लवकर परतीचा प्रवास सुरू करण्याची आमची दोघांचीही तयारी नव्हती. तेव्हा आता काय पहाता येईल याची चर्चा झाली आणि साता-याच्या अजिंक्यता-याचे नाव पुढे आले. सातारला अनेकदा येऊनही आम्ही हा किल्ला पाहिला नव्हता आणि तो फारसा अवघड (त्यामुळे वेळखाऊ) नाही ही ऐकीव माहिती आम्हाला होती. तेव्हा आम्ही साता-याच्या दिशेन गाडी वळवली आणि तिथे पोचल्यावर एकादोघांना विचारून अजिंक्याता-याची वाट पकडली. किल्ल्याच्या अगदी वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे हा किल्ला अगदी कुणालाही सहज पाहता येऊ शकतो. अजिंक्यता-यावर दूरदर्शनचे सहक्षेपण केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे उंचच उंच मनोरे गडावर दिसतात. अजिंक्यतारा ही अक्षरे, एका देवीचे मंदिर अशी काही पाहण्यासारखी ठिकाणे वर आहेत. काही पडक्या वास्तू, एक दोन बांधलेले तलावही किल्ल्यावर आहेत. किल्ल्यावरून खाली अस्ताव्यस्त पसरलेल्या साता-याचे दृश्य दिसते. किल्ला पाहून आम्ही निघालो तेव्हा पावसाला सुरूवात झाली होती. वातावरण असे होते की असे वाटावे हा पाऊस रात्रभर चालू राहील - पण तसे काही झाले नाही. आम्ही साता-यात येईतो पाऊस थांबला आणि तो पुढे पुण्यात पोचेपर्यंत मला पुन्हा भेटला नाही.<br />
<br />
परत जाताना भावाला वाल्ह्याला सोडायचे असल्याने सातारा-लोणंद-वाल्हे असा रस्ता आम्ही धरला. भावाला वाल्ह्याला सोडून पुढे (जेजुरीत पालखी असल्याने) परिंचेमार्गे सासवड गाठून मी पुण्याला पोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. घरी पोचेपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव अन् अवयव बोलू लागला होता. असे असले तरी मनात मात्र एक, दोन नव्हे तर तब्बल तीन नवे किल्ले पाहिल्याचे समाधान होते. 'मी सिंहगडावर एकच महिना राहतो, पण तिथली ताजी हवा मला वर्षभर पुरते.' असे लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. मलाही काहीसे तसेच वाटत होते. तीन गडांच्या या ताज्या हवेवर माझे पुढचे काही दिवस तरी नक्कीच समाधानाचे जाणार होते.<br />
<br />
या सहलीचे फोटो आपणास <a href="https://picasaweb.google.com/106129066989624250880/3Forts">येथे</a> पहाता येतील.</div>अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-15735266621223673502012-05-31T23:28:00.001+05:302012-05-31T23:28:40.733+05:30मुस्लिम आरक्षण आणि विरोधकांची कोल्हेकुई!आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारने मुस्लिमांना इतर मागास वर्गीय कोट्यात दिलेले साडेचार टक्के आरक्षण रद्द केल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय निघाला की काही लोकांची मूळव्याध उपटते तशी ती (न्यायालयाचा निर्णय आरक्षण रद्द करणारा असला तरीही) यावेळीही उपटली आहे आणि मुस्लिमांना आरक्षण म्हणजे सरकारचे मुस्लिमांपुढे सपशेल लोटांगण कसे आहे आणि त्यामुळे या देशाचा सत्यानाश कसा होणार आहे हे त्यांनी मोठमोठ्याने ओरडून सांगायला सुरुवात केली आहे. या सा-यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या देशात हिंदूंना आरक्षण दिले तर तुम्हाला चालते, मग या देशात पिढ्यानपिढ्या राहिलेल्या, या देशावर तेवढेच प्रेम करणा-या, या देशाचा अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिमांना आरक्षण दिले तर बिघडले कुठे?<br />
<br />
मुस्लिम समाजाची सरासरी आर्थिक स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाही हे समजण्यास तुम्ही कुणी आर्थिक तज्ञ असण्याची गरज नाही. या समाजातला बहुतेक वर्ग अशिक्षित नि गरीब आहे, शिक्षण आणि त्यामुळे येणारे फायदे अशा गोष्टींपासून तो पूर्णपणे अनभिज्ञ आहे. या समाजाला आरक्षणाची गरज आहे ती यामुळेच. आरक्षणामुळे गरीबीतून वर येण्याची संधी या समाजाला मिळणार आहे, त्याबरोबरच आपल्याला वेगळी वागणूक मिळते, समाजाच्या मुख्य धारेत येण्याची संधी आपल्याला मिळत नाही ही भावना नाहीशी होण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.<br />
<br />
एका बाजूला मुस्लिम स्वतःला या देशाचे नागरीक मानत नाहीत, ते समाजात मिसळत नाहीत, ते आपापले घोळके बनवून त्यातच जगतात असे आरोप करायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांना शिक्षण, नोकरी अशा संधी उपलब्ध करून देणा-या मुस्लिम आरक्षणाला विरोध करायचा हा शुद्ध खोटेपणा आहे. आरक्षणाचा मूळ हेतू काय? विशिष्ट जातीमधे, मागास घरामधे, गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाला एक खास संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येता येईल आणि स्वत:ला आणि आपल्या घराला प्रगतीच्या वाटेवर नेता येईल. मुस्लिम आरक्षणामुळे हे उद्देश साध्य होत असताना त्याला विरोध का? एक श्रीमंत हिंदू मुलगा त्याच्या जातीमुळे आरक्षण मिळवतो मात्र आपण गरीब असूनही फक्त मुस्लिम असल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही हे पाहणारा मुस्लिम मुलगा जर सा-या व्यवस्थेला आपला शत्रू मानू लागला तर यात दोष कुणाचा?<br />
<br />
आरक्षण सुरू झाले ते मागे राहिलेल्यांना पुढे येण्याची एक संधी म्हणून. असे असताना हा या धर्माचा, तो त्या धर्माचा हा भेदभाव कशाला? जे गरीब आहेत, जे अजून मागासलेले राहिले आहेत अशा सा-यांना आरक्षण मिळायला हवे. किंबहुना आरक्षण जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर न देता ते आर्थिक परिस्थितीवर देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच मुस्लिम आरक्षणाला आंधळा विरोध न करता सारासार विचार करून त्याला पाठिंबा देणे यातच शहाणपणा आहे.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-53455143627867560372012-04-02T16:54:00.004+05:302012-04-02T17:12:13.791+05:30कवी ग्रेस यांचे निधन आणि काही प्रश्नांची उत्तरेमराठीतील ज्येष्ठ कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचे गेल्या सोमवारी निधन झाले. या मनस्वी कलाकाराने कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि काळाने त्यांना आपल्या क्रूर विक्राळ जबड्यात ओढून नेले. सन १९६७ मध्ये 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आपल्या लेखणाने ग्रेस त्यांच्या वाचकांना निरंतर आनंद देत गेले. आपल्या गूढ, गहि-या पाण्यासारख्या भासणा-या कवितांनी हा कवी आयुष्यभर रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिला. ग्रेस यांच्या तरल, अर्थाचे अनेक पापुद्रे असलेल्या कविता आता वाचायला मिळणार नाहीत हे कळून चुकल्यावर जे लाखो रसिक हळहळले त्यात मीही आलोच.<br /><br />आता मुद्दा ग्रेस यांच्यावर होणा-या दुर्बोधतेच्या आरोपाचा. दुर्बोधता म्हणजे काय? तर ज्याचा बोध होत नाही ते दुर्बोध. पण एका कलाकारावर दुर्बोधतेचा शिक्का मारताना आपण ही महत्वाची गोष्ट विसरतो की कलाकृती आणि संकल्पना यात एक मुलभूत फरक आहे. संकल्पना हे वास्तव असते, आपल्या आजूबाजूच्या एखाद्या वस्तूतून तिची सत्यता पटवून देता येऊ शकते. अशी एखादी संकल्पना जर दुर्बोध असेल तर ती संकल्पना समजून देणा-याचा तो दोष मानायला हवा. पण कलाकृती ही संकल्पना नव्हे, ते वास्तव नव्हे, तो असते एका कलाकाराचा कलाविष्कार, त्याची अभिव्यक्ती! एका कलाकाराला जे सांगायचे आहे ते तो कागद-रंग-ब्रश, दगड-हातोडी किंवा कागद-पेन अशा विविध माध्यमांमधून व्यक्त करतो आणि एका कलाकृतीला जन्म देतो. त्याचे हे म्हणणे जर दुस-याला समजले नाही तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, ना ती कलाकृती बनवणा-याला ना ती समजून घेणा-याला. एक उदाहरणच द्यायचे झाले तर मी एखादे दगडी शिल्प बनवून त्याला एका आईचा आपल्या लहानग्यावरच्या प्रेमाचा आविष्कार म्हणू शकतो तर कुणाला तो फक्त एक चित्रविचित्र आकाराचा दगड वाटू शकतो. इथे कुणीच चुकीचा नाही किंवा बरोबर नाही. आपापल्या नजरेतून मी आणि तुम्ही या कलाकृतीकडे पाहू शकतो आणि तिचे आपल्याला भासतील ते अर्थही काढू शकतो. त्यामुळेच एडवर्ड मंचचे '<a href="http://lib.store.yahoo.net/lib/madisonartshop/most-famous-paintings-3.jpg">द स्क्रीम</a>' आणि साल्वादोर दालीचे '<a href="http://lib.store.yahoo.net/lib/madisonartshop/most-famous-paintings-5.jpg">द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी</a>' ही जगप्रसिद्ध चित्रे कुणाला अगदी सामान्य वाटू शकतात. कलाकृती म्हणजे गणित नव्हे, तिथे दोन अधिक दोन चार होणे गरजेचे नाही, तिथे ते पाच तर कधी तीनही होउ शकतात!<br /><br />पण मग कोणी विचारेल - असे असेल तर मग सगळेच दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार म्हणायला हवेत का? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे नाही. प्रत्येक दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार नसतो, तसे असते तर उत्तम कलाकार होणे फारच सोपे झाले असते. मराठी काव्यसृष्टीतलेच उदाहरण द्यायचे झाले तर दुर्बोधतेचा आरोप झालेले कवी लाखो होऊन गेले पण त्यातल्या प्रत्येकालाच मर्ढेकर किंवा ग्रेस बनता आले नाही. गारगोटी आणि हिरा हे वरवर सारखे दिसत असले तरी त्यात फरक असतोच की!<br /><br />तात्पर्य हे - ग्रेस तुम्हाला कळत नाहीत का, मग मुळीच उदास होऊ नका. ग्रेस पुन्हा एकदा वाचा, तरीही कळले नाहीत तर सोडून द्या. असे झाले तर वाईट वाटून घेण्याची गरज नाही आणि 'शब्दबंबाळ, अर्थहीन कविता लिहिणारा कवी' अशी ग्रेस यांच्यावर टीका करण्याचीही गरज नाही. गेस यांच्या कविता आवडत नाहीत, मग बालकवींची 'औंदुंबर' वाचा किंवा कुसुमाग्रजांची 'कोलंबसाचे गर्वगीत' वाचा. इतरांना काय वाटते ते पहाण्यापेक्षा आपल्याला जे आवडते त्याचा आस्वाद घेणे महत्वाचे, खरे की नाही?<br /><br />लेखाचा शेवट करतो माझ्या अतिशय आवडत्या ग्रेस यांच्याच एका कवितेने!<br /><span style="font-weight:bold;"><br />भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…<br />मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…<br /><br />हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया<br />झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया<br /><br />त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती<br />क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती<br /><br />तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला<br />सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला<br /><br />देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब<br />थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब<br /><br />संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने<br />देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने<br /><br />स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे<br />हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे<br /><br />ते धुके अवेळी होते, की परतायची घाई<br />मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई</span>अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-14968537588215228502012-02-29T23:57:00.000+05:302012-02-29T23:59:37.370+05:30किनारा तुला पामराला!२७ फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्यांचा हा जन्मदिवस. तेव्हा या सोनेरी दिवसानिमित्त चला आज तात्यांच्याच एका काव्याचे रसग्रहण करूयात - त्यांच्या "कोलंबसाचे गर्वगीत" या कवितेचे.<br /><br />"कोलंबसाचे गर्वगीत"ही कविता एका खलाशाचे मनोगत आहे. हे मनोगत खलाशाचे असले तरी ते सगळ्या मानवजातीचेच मनोगत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. निसर्ग नि मानव यांमधला संघर्ष जुना आहे, अगदी माणूस जन्मला त्या दिवसापासूनचा. "तू मला थांबवू शकत नाहीस" असे निसर्गाला सांगणारा माणूस तर "तू माझ्यासमोर कस्पटासमान आहेस, या पृथ्वीवर सत्ता आहे ती फक्त माझीच" असे म्हणणारा निसर्ग यांमधला हा संघर्ष पुर्वी होता, आजही आहे आणि अजून लाखो वर्षांनीही असेलच. सागर अर्थात समुद्र ह्या निसर्गाच्या अशाच एका रौद्र रुपाला उद्देशून गायलेले हे मानवकाव्य माणसाची कधीही हार न मानणारी वृत्ती दाखवून देणारे आहे.<br /><br />या काव्याचा प्रसंग आहे एका जहाजावरचा. हे जहाज भर समुद्रात एका वादळात सापडलेले आहे. वादळ आहे म्हटल्यावर पाऊस हवाच, आणि तो आहेही. पाऊस केवढा, तर माथ्यावरती नभ फुटले आहेत की काय असे वाटावे एवढा. या सगळ्या गोष्टींची परिणीती मोठाल्या लाटा तयार होण्यात झालेली आहे, लाटा केवढ्या तर पाण्याचे पर्वत वाटतील अशा. <br /><br />हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या<br />समुद्रा, डळमळु दे तारे!<br />विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे<br />ढळु दे दिशाकोन सारे!<br /><br />एकूणच सारी परिस्थिती अशी आहे की वाटावे कुणी सैतान वेताळांचा मेळा जमवून या दर्यावरती तांडवनृत्य करत आहे. पण असे असले तरी आपला हा शूर खलाशी अजिबात हिंमत हारलेला नाही. सागराला उद्देशून तो म्हणतो, "अशा, याहून कितीही भयंकर गोष्टी घडल्या तरी आम्ही घाबरणार नाही, अरे नाविकांना कसली भिती?" मृत्युचे हे थैमान पाहून बावरलेल्या आपल्या सहका-यांना तो म्हणतो, "सहका-यांनो खंत का करता? आपला जन्मच झगडण्यासाठी झाला आहे. पळ काढणे हा आपला बाणा आहे का? तसे जगायचे असेल तर मग त्यापरीस जलसमाधी घेतलेलीच चांगली नाही का?"<br /><br />आपल्या सहका-यांना खडे बोल सुनावताना तो पुढे म्हणतो, "या जगात कोट्यावधी जिवाणू रोज जन्माला येतात नि मरतात. जर आपण असे लाजिरवाणे जिणे जगलो, तर त्यांच्यात नि आपल्यात फरक काय?"<br /><br />पुढे समुद्राला तो म्हणतो, "पैसा किंवा घराची उब आम्हाला थांबवू शकत नाही, मानवतेचे निशाण महासागरात मिरवणे आणि नवनवीन खंड जिंकून घेणे हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करूच."<br /><br />पण कवितेत सगळ्यात लक्षवेधे आहे ते तिचे शेवटचे कडवे.<br /><br />चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती<br />कथा या खुळ्या सागराला<br />"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा<br />किनारा तुला पामराला"<br /><br />"मित्रांनो, ती शिडे गर्वाने वरती उभारा आणि या खुळ्या सागराला सांगा - अरे आमची ध्येयासक्ती अनंत आहे, आमची आशा अनंत आहे, तिला थांग नाही अन मोजमाप नाही. किनारा असेल तर तो तुला खुळ्यालाच!"<br /><br />हे पक्के माहीत असल्यामुळेच की काय, मानव पाणी अडवून मोठाली धरणे बांधतो आहे, डोंगर पोखरून त्यांच्या पार जातो आहे, हवेत उड्डाण करून आकाशाला गवसणी घालतो आहे आणि मोठमोठी जहाजे समुद्रात हाकारून तो आपल्या कवेत करून घेतो आहे. मानवाची ही दुर्दम्य इच्छाशक्ती थक्क करणारी आहे आणि ती कवितारुपात अजरामर करणा-या कुसुमाग्रजांची प्रतिभाही!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-70562118505186688472012-01-23T20:25:00.001+05:302012-01-23T20:25:44.853+05:30निवडणूक आयोग नावाचा विनोदसध्या निवडणुकांचा मोसम आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तर मुंबई महानगरपालिकेसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यांमधल्या निवडणुकाही आहेतच. न केलेल्या कामांची यादी सादर करून आणि भलतेभलते वादे, आश्वासने देऊन उमेदवार मतदारांना हसवणार हे पक्के असले तरी यात आपल्यापरीने विनोद करून निवडणूक आयोगही भाग घेणार यात काय शंका?
<br>
<br>पहिला मुद्दा उमेदवारांच्या खर्चाचा. निवडणूक आयोग उमेदवाराने खर्च केलेल्या पै नि पैचा खर्च ठेवतो खरा, पण कधीपासून? त्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून. आपली उमेदवारी जाहीर करण्यापुर्वी उमेदवार जे करोडो रुपये खर्च करतात त्यांचे काय? आपल्याला तिकीट मिळावे म्हणून केलेले शक्तीप्रदर्शन, मतदारांना खूश करण्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम, झोपडपट्ट्यांमधे फुकट वाटलेल्या वस्तू, प्रत्येक कार्यकर्त्यावर केलेला हजारो रुपयांचा खर्च यांचे काय? यावर एक सोपा उपाय आहे. निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आपला खर्च दाखवणे आयोगाने प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक करावे. जे असे करणार नाहीत त्यांना आयोगाने उमेदवारी देऊ नये.
<br>
<br>दुसरा मुद्दा आहे आयोग पाठवत असलेल्या नोटिशींचा. आचारसंहिता लागू झाली रे झाली की प्रत्येक दिवशी कुण्या नेत्याने तिचे उल्लंघन केल्याची नि आयोगाने त्याला नोटीस पाठवल्याची बातमी ऐकायला मिळते. या नोटिशींचे पुढे काय होते? अशा एखाद्या घटनेमुळे कुठल्या नेत्याला निवडणुकीत भाग घेता न आल्याची घटना घडलेली कुणी पाहिली आहे काय? आता याच निवडणुकीचे उदाहरण घ्या. पुण्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे थोर नेते, महापुरूष अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असतानाही एका कामाचे भूमिपूजन (की उद्घाटन) केल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आणि आयोगाने त्यांना नोटीस बजावली. गंमत अशी की पवारांनी केलेल्या नोटिशीने आयोगाचे ताबडतोब समाधान झाले आणि त्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही. हा काय पांचटपणा आहे? अरे जर असल्या खुलाशाने तुमचे समाधान होत असेल तर मग त्या नोटिसा पाठवण्याचे नाटक तरी कशाला?
<br>
<br>तिसरा मुद्दा आयोगाच्या चंपक निर्णयांचा. आयोगाने उत्तर प्रदेशात नुकताच असाच एक निर्णय जाहीर केला. मायवतींनी उभारलेल्या उद्यानातले हत्तींचे पुतळे झाकण्याच. भारतातला शासकीय कारभार विनोदी असल्याचे मला माहिती असले तरी अजूनतरी एवढा प्रचंड विनोदी निर्णय कुठे घेतला गेल्याचे मला आठवत नाही. हे पुतळे झाकून काय होणार आहे? उलट ते झाकल्यामुळे लोकांची उत्सुकता चाळवणारच नाही का? आणि त्यासाठी होणा-या खर्चाचे काय? आणि मग एखादा हत्ती पाहूनही लोकांना मायावती आठवतील (हे वाक्य शब्दशः घेऊ नये!) म्हणून तुम्ही जंगलातल्या हत्तींनाही झुली चढवणार आहात का?
<br>
<br>निवडणूक आयोगाने हा विनोदी प्रकार आता थांबवावा. दरवर्षी नवनवीन चित्रविचित्र नियम काढणारा निवडणूक आयोग आणि त्या नियमांचे कागदोपत्री तंतोतंत पालन करून दाखवणारे उमेदवार हे चित्र आता आयोगाने बदलावे. निवडणुका आल्या की वाहतुकीची कोंडी होते, चौक अडवले जातात, मटणाच्या जेवणावळींसाठी लाखो बोकडांची कत्तल होते, दारूचे पाट वहातात, परराज्यांतून गुंड आणले जातात, आणि 'साम, दाम, दंड, भेद' या सुत्राचा वापर करून मतदारांना आपल्याकडे ओढले जाते. प्रत्यक्ष निवडणुकांमधे होणारे बोगस मतदानाचे प्रकार वेगळेच. हे सारे प्रकार थांबवण्यासाठी आयोगाने कष्ट घ्यावेत, नुसत्या नोटिसा देऊन आणि रोज नवे नियम बनवून काय होणार आहे?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-84056782748405204802011-12-27T21:03:00.001+05:302011-12-27T21:03:43.422+05:30छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?सध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय? त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?'
<br>
<br>कुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते!) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम? आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही? बदला कंपनी!' एवढे हे सारे सोपे झाले आहे.
<br>
<br>छोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच! अरे काय चाललंय काय हे? पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.
<br>
<br>आजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवता किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-18836416541138333822011-12-22T20:25:00.001+05:302011-12-22T20:25:40.687+05:30नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथाकाही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.
<br>
<br>नात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [<a href="http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/">http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/</a>] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का? आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय? म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का?
<br>
<br>नात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का? (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. <a href="http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm">http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm</a> या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.
<br>
<br>भारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-22029066728831909882011-11-30T21:59:00.000+05:302011-11-30T22:00:02.021+05:30कबूतर, जा... जा... जा...भाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी!) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.
<br>
<br>कारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का?) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.
<br>
<br>खरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै?) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे?)
<br>
<br>असो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-58534784324312891422011-11-26T23:42:00.002+05:302011-11-26T23:51:32.696+05:30हरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते!हरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.<br /><br />सध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली? शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत? म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का?<br /><br />घडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या?' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार!<br /><br />पण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय? त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी!<br /><br />आणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते! मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का? 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे? एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो!<br /><br />असो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे! कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-41404895854474370212011-11-11T18:05:00.001+05:302011-11-11T18:05:59.874+05:30मराठी माणूस आणि दिवाळी अंक!तर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा <a href="http://mr.upakram.org/node/3522#comment-60990">http://mr.upakram.org/node/3522#comment-60990</a> हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.
<br>
<br>आता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे? पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का? आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना? मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे? मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.
<br>
<br>दिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा? आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-21919927256979840352011-10-21T20:03:00.001+05:302011-10-21T20:03:50.919+05:30खडकवासल्याचा धडा!खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
<br>
<br>हा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.
<br>
<br>श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून?' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय? वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.
<br>
<br>श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का? आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार? पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार? (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील?
<br>
<br>बाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.
<br>
<br>असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-35569127213061172822011-10-15T15:50:00.001+05:302011-10-15T15:50:21.796+05:30स्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर!कुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार? पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते?
<br>
<br>स्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय? त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय? आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय?
<br>
<br>स्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता? ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल? स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [<a href="http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020">http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020</a>] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का?
<br>
<br>आता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-1023355963595014062011-09-29T12:11:00.002+05:302011-09-29T12:22:18.904+05:30ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...रविवारी मटात "हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून 'हृदयेश आर्टस्' तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे आणि या माळेतला पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे" ही बातमी वाचली आणि हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.<br /><br />हृदयनाथ मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार लतादिदींना देऊन आता काय साध्य होणार आहे? पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय? आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही? किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही! त्यात हे प्रकार कुण्या पुढारी घराण्याने केले तर ते समजण्यासारखे आहे, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अशा वागण्याची अपेक्षा नक्कीच महाराष्ट्राला नाही.<br /><br />आता मंगेशकर कुटुंबियांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत थोडेसे. लता मंगेशकर यांना भारत सरकारचा 'भारतरत्न' पुरस्कार मिळालेला आहे. लता भोसले यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना मनोमन तो देऊनच टाकला आहे. (आणि तसाही त्यांना पद्मविभूषण आहेच.) आणि हृदयनाथांबद्दल काय बोलावे? त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय? किंबहुना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर, लता मंगेशकर यांनी इतर पुरस्कार नाकारणेच योग्य नव्हे काय?<br /><br />असो. कितीही पोटतिडकीने लिहिले तरी एकूण रागरंग पहाता रविवारी हृदयनाथ लतादिदींना हा पुरस्कार देतील आणि त्याही तो स्वीकारतील याबाबत मला तरी मुळीच शंका वाटत नाही. तेव्हा सध्यातरी देवाकडे इवढीच प्रार्थना करतो, 'ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...'अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-63675258385667671862011-09-25T22:23:00.003+05:302011-09-25T22:32:47.054+05:30कोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)तिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते!<br /><br />त्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.<br /><br />आज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. पंधरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी तसंच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-29803183643226504652011-09-15T00:18:00.003+05:302011-09-15T00:27:04.445+05:30वाह ताज!असं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.<br /><br />मी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता!) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.<br /><br />उत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं? त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का?<br /><br />पण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच! आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज!'<br /><br />[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]<br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTuxd99vMAKarHGPtBIiRfIi7dbTQzruGSSSLApwI4FtmAawhGWEBq2BeVMjSa_iiFW7kwUK8so-jWTwmVl9bwlwV_DQ6sLqkxXD55nRVRs9xicJle70fe4DI5A9DJpybv2vpM1mgXNxg/s1600/Image00058.jpg"><img style="cursor:pointer; cursor:hand;width: 267px; height: 400px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTuxd99vMAKarHGPtBIiRfIi7dbTQzruGSSSLApwI4FtmAawhGWEBq2BeVMjSa_iiFW7kwUK8so-jWTwmVl9bwlwV_DQ6sLqkxXD55nRVRs9xicJle70fe4DI5A9DJpybv2vpM1mgXNxg/s400/Image00058.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5652290526062125634" /></a><br /><br><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDMpRf-6lXZowKgmixW_wzK-4JdplnrYVkXShvKIi-vyW_AKe2SbYnY4IbDau4L4TJivrFDwai1ecoLtSqfLxZ0IfHMLnsukU2s-BtjAgO_bAId7k1dsXg4hN9sl9836vLQwtXssuoQF4/s1600/Image00057.jpg"><img style="cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDMpRf-6lXZowKgmixW_wzK-4JdplnrYVkXShvKIi-vyW_AKe2SbYnY4IbDau4L4TJivrFDwai1ecoLtSqfLxZ0IfHMLnsukU2s-BtjAgO_bAId7k1dsXg4hN9sl9836vLQwtXssuoQF4/s400/Image00057.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5652290524277778258" /></a><br /><br /><br><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzrrWT6ODuc6NeykRq9d6Garj0uLZdiu_H-3R3Be6B0wvIIn7HZ7ervsZ3RSj2YZkvAXN-8gaqrymm2WtWCFKPYJp2hUiB4RnPXUd2IPmEq2LopnajgX2Yfk3eIC1Xo90qtMJ1tW_TElI/s1600/Image00056.jpg"><img style="cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzrrWT6ODuc6NeykRq9d6Garj0uLZdiu_H-3R3Be6B0wvIIn7HZ7ervsZ3RSj2YZkvAXN-8gaqrymm2WtWCFKPYJp2hUiB4RnPXUd2IPmEq2LopnajgX2Yfk3eIC1Xo90qtMJ1tW_TElI/s400/Image00056.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5652290517399030450" /></a><br /><br /><br><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEingNgvNlxL_5-srerC5_QPvOhzT-gNUnCtCmFsSzRtoX3zJA-xB56RGmcoLEVw40V1jP2ypbPTE93AAmjlSJQoKNUhR9sPrR_Q0wpuZzaodnWbTCt9t-UYOOn4XY277sCmA5gJvddC_yU/s1600/Image00055.jpg"><img style="cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 267px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEingNgvNlxL_5-srerC5_QPvOhzT-gNUnCtCmFsSzRtoX3zJA-xB56RGmcoLEVw40V1jP2ypbPTE93AAmjlSJQoKNUhR9sPrR_Q0wpuZzaodnWbTCt9t-UYOOn4XY277sCmA5gJvddC_yU/s400/Image00055.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5652290518773891234" /></a>अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-88417570407776620882011-09-11T21:06:00.003+05:302011-09-15T00:28:14.047+05:30गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!अखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत्ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण!’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल? मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.<br /><br />आमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास!’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास?’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे. <br /><br />असो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’<br /><br />वि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो!<br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtUHquJf7809DTqLEZs2e7aqLvrY2H1ssGD5vzF1z82bGr4v5OULW2RMqPLuCTJOXaK3KamRydOVnhEPxNM5yfpg3dKb7iVG0H5-jtER5SWaEi-jJZQENLRyEOFdT5X2r1EL-T1xlDUh0/s1600/Image00011.jpg"><img style="cursor:pointer; cursor:hand;width: 285px; height: 400px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtUHquJf7809DTqLEZs2e7aqLvrY2H1ssGD5vzF1z82bGr4v5OULW2RMqPLuCTJOXaK3KamRydOVnhEPxNM5yfpg3dKb7iVG0H5-jtER5SWaEi-jJZQENLRyEOFdT5X2r1EL-T1xlDUh0/s400/Image00011.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5651127068421308178" /></a>अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-88818915799536521172011-08-17T14:14:00.001+05:302011-08-17T14:14:14.103+05:30कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २दुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी! काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.
<br>
<br>किल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.
<br>
<br>लो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय?
<br>
<br>त्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.
<br>
<br>जेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील?'
<br>
<br>थिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.
<br>
<br>रत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-32872777075087515752011-08-12T20:57:00.003+05:302011-08-14T19:39:30.695+05:30कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.
<br />
<br />पुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.
<br />
<br />शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे!
<br />
<br />कोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे? तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.
<br />
<br />सुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता!) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.
<br />
<br />टीप १: या सहलीचे फोटो आपणास <a href="https://picasaweb.google.com/abhipandkar/ratnagiritrip2011"> येथे </a> पहाता येतील.
<br />
<br />टीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-78102508952104136402011-08-10T21:08:00.006+05:302011-08-10T21:18:08.308+05:30अदेन सलाद आणि आपण'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.
<br />
<br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://inapcache.boston.com/universal/site_graphics/blogs/bigpicture/africahorndrought_072211/bp14.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 396px; height: 268px;" src="http://inapcache.boston.com/universal/site_graphics/blogs/bigpicture/africahorndrought_072211/bp14.jpg" border="0" alt="" /></a>
<br />
<br />हे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.
<br />
<br />या चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं?' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का? आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.
<br />
<br />केनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-77195161806195672542011-07-29T19:46:00.003+05:302011-08-03T23:57:28.368+05:30गुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेडलेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा <a href="http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid">http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid</a> हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का? की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे?<br /><br />मला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो!' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा असा की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.<br /><br />साहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार? मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे! असे का झाले असावे? माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही!)<br /><br />हे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा? मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.<br /><br />सगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid? हा माझा शोध गुगलने is google making us stupid? असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-80650766677986266582011-07-15T16:20:00.001+05:302011-07-15T16:20:48.422+05:30मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटबुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल? आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ज्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे?
<br>
<br>या बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय! त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार? अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार? नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार?
<br>
<br>राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना? पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल? मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल? दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?
<br>
<br>पण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-48309626494849295692011-07-07T23:56:00.002+05:302011-07-08T00:00:01.495+05:30हे सारे अद्भुत आहे!'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे!' असे वाटून मी आजही अचंबित होतो.<br /><br />उदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तविक ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही? हे सगळे कसे होत असेल? आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल? इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल? दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल? मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल?<br /><br />पण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.<br /><br />सध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चालायलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-68877617719391523532011-06-30T23:50:00.001+05:302011-06-30T23:51:56.858+05:30मनमोहनसिंग साहेब, आवरा...वृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे?<br /><br />पंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही. <br /><br />सरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही?<br /><br />वाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-55975767195042587422011-06-25T13:25:00.003+05:302011-06-25T13:32:44.920+05:30किती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब?जुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार? तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी?<br /><br />जुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का? मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.<br /><br />जुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार? जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते? अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का? नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी!<br /><br />यावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय?' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे? निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-8131047458509324312011-06-18T23:53:00.003+05:302011-06-19T00:13:05.755+05:30का? ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात?कधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.<br /><br />ही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी! कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र(?) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल? ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय?<br /><br />लग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय?<br /><br />ही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील? हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे?अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.com10