Wednesday, March 30, 2011

प्रिय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब!

मोहाली येथे ३० मार्च रोजी होणारा भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ गिलानी यांना आमंत्रित करण्याचा आपल्या सरकारचा निर्णय खरोखरच धक्कादायक नि प्रचंड संताप आणणारा आहे. भारत हा सामना हारला तर जेवढा संताप होईल त्यापेक्षा दहा पट संताप आपल्या या निर्णयामुळे आत्ता आम्हाला होत आहे असे म्हटले तर त्यात काडीचीही अतिशयोक्ती होणार नाही!

मनमोहन सिंग, आम्ही कोणी मोठे राजकारणतज्ञ नाही, पण या दरिद्री प्रस्तावामागचे कारण आपण आम्हाला सांगू शकाल काय? पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे, ते वाकडे ते वाकडेच राहणार हे आम्ही का आपल्याला सांगायला हवे? हे शेपूट कापणे हाच त्याचा त्रास संपवण्याचा एकमेव उपाय आहे, ते सरळ करण्यात वेळ घालवणे शुद्ध वेडेपणा होय. पाकिस्तानतल्या नद्यांमधे आणि तेथील प्रत्येक माणसाच्या रक्तामधे भारतद्वेष वाहतो आहे, हे आपल्याला माहीत नाही का? या देशाच्या अतिरेक्यांनी भारतात येऊन शेकडो निरपराध भारतीयांची (नि काही परदेशी पाहुण्यांची) कत्तल केलेल्यास अजून पुरती तीन वर्षेही झाली नाहीत हे आपण विसरलात काय? छत्रपती शिवाजी टर्निमस येथील रक्ताचे डाग अजूनही ओले आहेत, लिओपोल्ड कॅफेमधील काचांना बंदुकीच्या गोळ्यांनी गेलेले तडे अजून तसेच आहेत आणि गोळीबारात अडकलेल्या अनेकांच्या कानांना बंदुकींच्या दणदणाटाने गेलेले दडे अजूनही मोकळे झालेले नाहीत; हे सगळे असे असताना आपण हा लाजिरवाणा निर्णय कसा घेऊ शकता?

आणि आम्ही म्हणतो, एवढेच जर करायचे आहे तर मग त्या अजमल कसाबने काय घोडे मारले आहे? त्यालाही सामना पाहण्यास बोलवा आणि तुमच्या नि गिलानी साहेबांच्यामधे बसवा. त्याहून उत्तम गोष्ट म्हणजे सामन्यानंतर त्याला गिलानी साहेबांबरोबर (सुटाबुटाचा आहेर करूनच) घरी पाठवून द्या. असे झाल्यावर तर काय, पाकिस्तान २६/११ घडलेच नाही असेही कमी करणार नाही!

मनमोहनसिंग साहेब, आम्ही आपल्याला एक सज्जन गृहस्थ समजत होतो, पण आपले सहकारी करत असलेले घोटाळ्यांचे नवनवे विक्रम (नि आपली त्यांना मूकसंमती) पहाता आमचे ते म्हणणे चुकीचे होते असेच आता म्हणावे लागते आहे. कौरवांची सगळी दु:साहसे निमूटपणे पाहणा-या नि आतून त्यांना प्रोत्साहन देणा-या धृतराष्ट्रासारखे आपले हे वागणे आहे. नुकताच आपण घेतलेला हा निर्णय तर या सगळ्यावर कडी करणारा आहे. सामना सुरू होण्यास अजूनही एक तास आहे, आपण करोडो भारतीयांना क्लेश देणारा हा निर्णय बदलावा आणि पाकिस्तानाच्या अतिरेकी कारवायांमधे वेळोवेळी बळी पडलेल्या हजारो भारतीयांची विटंबना थांबवावी अशी मी आपल्याला विनंती करतो.

ईश्वर आपल्यास सुबुद्धी देवो!

आपला नम्र,
तिरशिंगराव टिकोजीराव पुणेकर

1 comment:

  1. पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे हे मान्य, पण ते कापून भारताने श्राद्ध विकत घेऊ नये.

    ReplyDelete