प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, माझीही आहेत. ’होंडा अॅकॉर्ड’ गाडी विकत घेणे, ऑस्ट्रेलियात जाऊन ’सिडने’ ते ’पर्थ’ असा मोटारप्रवास करणे आणि ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहणे ही त्यापैकी काही निवडक स्वप्ने. त्यापैकी ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले, त्याच स्वप्नप्रवासाची ही कथा आहे.
या प्रवासाची तयारी सुरू झाली ती जून/जुलै मधेच. मे मधे ’बदामी’ नि ’हंपी’ अशी सहल केल्यावर ’आता पुढची सहल कुठे’ अशी चर्चा झाली नि अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव नक्की झाले. पुणे ते चेन्नै असा प्रवास रेल्वेने नि चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास बोटीनेही करता येतो असे आम्हाला कुणीसे सांगितले खरे, पण सावरकरांना ज्या बोटीने नेले तीच बोट आजही वापरली जाते आणि चैन्नैला बसलेल्या लोकांपैकी अंदाजे निम्मेच लोक पोर्ट ब्लेअरला पोचतात असे कळल्यावर तो बेत रद्द झाला. एअर इंडियाच्या सेवेविषयी (नि हवाई सुंद-यांविषयी) फारसे चांगले ऐकले नसले तरी हा अनुभव बोटीपेक्षा नक्कीच सुखकारक असेल असे वाटल्याने शेवटी एयर इंडियाच्या महाराजालाच संधी देण्याचे ठरले.
विमानाची तिकीटे नक्की झाली, तेव्हा मी रेल्वे तिकिटांच्या मागे लागलो. पूर्वी रेल्वेच्या प्रवासात रेल्वेची तिकीटे काढणे नि प्रत्यक्ष रेल्वे प्रवास अशी दोन साहसे असत, रेल्वेने इंटरनेटवरही तिकिटे काढण्याची सोय केल्यापासून मात्र रेल्वेप्रवासाचे एकच साहस ते काय आता बाकी राहिले आहे. मी माझ्या वातानुकुलित कार्यालयात आरामदायी खुर्चीवर बसून रेल्वेची तिकिटे काढू शकेन असे मला काही वर्षांपुर्वी कुणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यातच काढले असते, सध्या मात्र महाजालाच्या कृपेने हे शक्य झाले आहे. ’टिम बर्नर्स ली’ साहेबाचे आभार मानावे तेवढे कमीच, बहुत काय लिहणे? सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकणा-या दादा लोकांसारखीच रेल्वे एजंट ही जमातदेखील काही वर्षांत नामशेष होईल की काय अशी मला आताशा भीती वाटते. असो, कालाय तस्मै नम: हेच खरे!
रेल्वेची तिकीटे मिळाली खरी, पण इथेही एक गोची होतीच. आमची रेल्वे सुटत होती रात्री (की पहाटे?) ००:१० वाजता. अनेकवेळा खात्री करूनच तिकिटे काढूनही ही तारीख चुकलेली आहे अशी भिती मला अगदी शेवटपर्यंत वाटत होती. माझे हे असेच आहे. अभियांत्रिकीचे पेपर देतानाही आपण अभ्यास करून आलोत तो पेपर आज नाहीच अशी भिती नेहमी मला वाटत असे. सुदैवाने तसे काही झाले नसले (माझे गुण पाहून काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत) तरी हा बागुलबुवा मला अजूनही त्रास देतोच.
असो, रेल्वेची तिकीटे मिळाली आणि मी थोडासा निर्धास्त झालो. यानंतर सुरू झाले माहिती मिळवण्याचे काम. गुगल साहेबांच्या कृपेने हेही आता खूपच सोपे झाले आहे. महाजालावर मी काही हॉटेले निवडली नि त्यांचे पैसे भरून टाकले. निदान पहिल्या दिवशी तरी हॉटेल आरक्षित केलेले असावे असा आमचा सहलीचा नियम आहे, जो आम्ही इथेही पाळला.
हा हा म्हणता दिवस गेले नि जाण्याचा दिवस उजाडला. शुक्रवार कामाचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्यांचा तेव्हाच निरोप घेतला होता आणि पूर्ण दिवाळी आम्ही सुट्टीवर असल्याने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही तेव्हाच झाली होती. सोमवारी पहाटे ००:१० वाजता आमची रेल्वे असल्याने रविवारी रात्री दहालाच निघणे क्रमप्राप्त होते, त्याप्रमाणे निघालो. मनाला आनंद होत असला तरी आत कुठेतरी थोडीशी धाकधूक होतीच. पुढचे १४ दिवस कसे जातील हा विचार सारखा मनाला त्रास देत होता. त्यात या सगळ्या सहलीचे नियोजन मीच केले असल्याने मला थोडी अधिकच चिंता होती. पण ’आता होईल ते होईल’ असे मी मनाशी म्हटले आणि आम्ही पुणे रेल्वेस्थानकात शिरलो.
जर गलिच्छ रेल्वे स्थानकांची स्पर्धा घेतली तर पुणे रेल्वे स्थानक त्यात नक्कीच पहिला नंबर पटकावेल असे माझे तरी स्पष्ट मत आहे. दिवाळी असल्याने लोकांची झालेली प्रचंड गर्दी, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच पसरलेल्या पथा-या, सा-या स्थानकभर पसरलेला लघवीचा वास हे सगळे सहन करताना फलाटावर साधे चालणेही मुश्किल झाले होते. प्रवाशांसाठी बांधलेल्या उड्डाणपुलावर तर कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरी सुरू होईल इतकी गर्दी होती. तरीही आम्ही त्या गर्दीत उडी घेतली नि आपल्या सामानासहित एकदाचे फलाट क्र. ३ वर पोचलो!
रेल्वे अस्वच्छ असली तरीही तिने प्रवास करणे मला आवडते. रेल्वेने प्रवास करताना ख-या भारताचे दर्शन घडते असे कुणीसे म्हटले आहे, आणि मला वाटते ते खरेच आहे. फलाटावरचे भिकारी, मोठी बोचकी घेऊन निघालेले मजूर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणारे शिष्ट श्रीमंत लोक आणि या सा-यांपासून स्वत:ला वेगळे ठेवणारे मध्यमवर्गीय असा एक अनोखा संगम तिथे दिसतो. असेच इकडेतिकडे पहाता पहाता वेळ कसा गेला ते कळलेही नाही नि एकदाचे १२:१० झाले. रेल्वे चक्क वेळेवर आलीही. तिकीटे नक्की झाली असल्याने डबा क्रमांक आणि बर्थ क्रमांक आमच्याकडे होतेच. आम्ही आमच्या S१ डब्याजवळ पोचलो आणि बाहेर लावलेल्या तक्त्यावर आमची नावे शोधू लागलो. तक्ता वाचताना मी एके ठिकाणी थबकलो, तिथला तो मजकूर पाहून मला आश्चर्याचा असा मोठा धक्का बसला म्हणता!
Sunday, November 28, 2010
Friday, November 26, 2010
पुलंचे एक रटाळ पुस्तक
'पुलंचे एक रटाळ पुस्तक' हे शीर्षक वाचून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल (कदाचित चिडलाही असाल) यात काही शंका नाही. पुलं आणि रटाळ या दोन गोष्टी एका वाक्यात एकत्र येणे कदापि शक्य नाही असे त्यांच्या चाहत्यांचे मत आहे, आणि ते योग्यच आहे. पुलंचे जवळपास सगळेच लिखाण सकस आणि दर्जेदार आहे. पाट्या टाकणे हे काम पुलंनी आपल्या आयुष्यात कधीही केले नाही आणि त्यांची पुस्तके वाचतानाच काय, त्यांची भाषणे ऐकताना आणि त्यांचे एकपात्री प्रयोग पाहतानाही याची खात्री पटते. त्यामुळेच मी पुलंचा मोठा पंखा आहे आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची मी पारायणे केली आहेत.
असे असले तरी पुलंचे अगदी झाडून सगळे लिखाण उत्तम आहे असे म्हणणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करण्यासारखे ठरेल. कुठल्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच केले जायला हवे. ते करताना त्या साहित्यकृतीचा जनक कोण, त्याचे साहित्यातील योगदान काय या बाबी विचारात घेतल्या जाता कामा नयेत. पुलंचे सुरुवातीचे लेखन पाहिले की माझ्या विधानाची खात्री पटावी. पुलंच्या नंतरच्या लिखाणात दिसणारा सफाईदारपणा, सहजता, सराईतपणा त्यात नाही. अर्थात, हे साहजिकच आहे. लेखक हा शेवटी एक माणूसच, तोही प्रत्येक दिवसागणिक घडत, शिकत असतो. पण असे असले तरी त्यांच्या चाहत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. एखादी साहित्यकृती सामान्य दर्जाची म्हटली म्हणून तिचा लेखक सामान्य ठरला असे नाही. (आणि लेखक महान असला म्हणजे त्याची प्रत्येक साहित्यकृती महान असलीच पाहिजे असेही नाही!)
आता पुन्हा एकदा वळूयात या लेखाच्या विषयाकडे - तो म्हणजे पुलंचे 'खोगीरभरती' हे पुस्तक. 'खोगीरभरती' हे पुलंचे दुसरे पुस्तक. 'तुका म्हणे आता' या नाटकानंतर आलेले हे पुस्तक त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अगदी सुरुवातीला लिहिलेले आहे. पुस्तकात एकूण १७ लेख आहेत, त्यातली ४ भाषणे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे पुलंचे हे लिखाण त्यांचे सुरुवातीचे लिखाण आहे. एका नव्या लेखकाचा अननुभवीपणा त्यात अगदी स्पष्ट दिसतो. पुलं ज्या विनोदासाठी ओळखले जातात तो सहज नि स्वाभाविक विनोद या पुस्तकात जवळपास नाहीच असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. या पुस्तकातले सगळेच विनोद हे अगदी ओढूनताणून केल्यासारखे वाटतात. एका होतकरू लेखकाची छाप या पुस्तकातल्या प्रत्येक लेखावर अगदी स्पष्ट दिसते. 'नाटक कसे बसवतात' आणि 'पानवाला' हे लेख सोडले तर बाकीचे सगळे लेख हे काही सांगण्यासारखे किंवा लिहिण्यासारखे आहे या कारणापेक्षा एक विनोदी लेख लिहायचा म्हणूनच लिहिल्यासारखे वाटतात.
तसे असेल तर असो! पण या लेखाचा उद्देश काय हा प्रश्न उरतोच – 'पुलंच्या एका पुस्तकातले दोष दाखवणे' हा? नाही, उद्देश आहे 'अपयशाने खचून न जाता नेटाने पुढे जात रहावे' हा संदेश वाचकांना देणे. मला वाटते हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. काम कुठलेही असो, दर वेळी त्यात यश मिळेलच असे नाही, आपण प्रयत्न करीत राहणे महत्वाचे. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तरीही निराश न होता 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करीत रहायला हवे. आपल्या भाईकाकांनी हेच केले. आपले पहिले नाटक पडले आणि दुसरे पुस्तकही लोकांना फारसे आवडले नाही हे दिसूत असूनही त्यांनी नेटाने आपले काम सुरुच ठेवले. 'कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा मात्र लोकांना हसवण्याचा धंदा' हे पुलंच्या जगण्याचे सूत्र होते नि त्यांनी ते आयुष्यभर कसोशीने पाळले. अर्थात विनोदी लेखक एवढीच पुलंची ओळख नाही, जीवन म्हणजे काय आणि ते त्याची गोडी चाखत कसे जगावे हे त्यांनीच आपल्याला सांगितले. आपल्याला खाण्यावर, गाण्यावर, सुंदर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं ते त्यांनीच. एकूणच आयुष्य रसिकतेने कसं जगावं हे आपल्याला दाखवून दिलं ते त्यांनीच.
'खोगीरभरती'सारखे पुस्तक लिहिणा-या या पुलंनीच पुढे 'बटाट्याची चाळ', 'खिल्ली', 'उरलंसुरलं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अजरामर पुस्तके आणि 'तुझे आहे तुजपाशी','ती फुलराणी' यांसारखी नाटके लिहून मराठीजनांना वेडे केले हे लक्षात घेतले तर आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे!
असे असले तरी पुलंचे अगदी झाडून सगळे लिखाण उत्तम आहे असे म्हणणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करण्यासारखे ठरेल. कुठल्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच केले जायला हवे. ते करताना त्या साहित्यकृतीचा जनक कोण, त्याचे साहित्यातील योगदान काय या बाबी विचारात घेतल्या जाता कामा नयेत. पुलंचे सुरुवातीचे लेखन पाहिले की माझ्या विधानाची खात्री पटावी. पुलंच्या नंतरच्या लिखाणात दिसणारा सफाईदारपणा, सहजता, सराईतपणा त्यात नाही. अर्थात, हे साहजिकच आहे. लेखक हा शेवटी एक माणूसच, तोही प्रत्येक दिवसागणिक घडत, शिकत असतो. पण असे असले तरी त्यांच्या चाहत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. एखादी साहित्यकृती सामान्य दर्जाची म्हटली म्हणून तिचा लेखक सामान्य ठरला असे नाही. (आणि लेखक महान असला म्हणजे त्याची प्रत्येक साहित्यकृती महान असलीच पाहिजे असेही नाही!)
आता पुन्हा एकदा वळूयात या लेखाच्या विषयाकडे - तो म्हणजे पुलंचे 'खोगीरभरती' हे पुस्तक. 'खोगीरभरती' हे पुलंचे दुसरे पुस्तक. 'तुका म्हणे आता' या नाटकानंतर आलेले हे पुस्तक त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अगदी सुरुवातीला लिहिलेले आहे. पुस्तकात एकूण १७ लेख आहेत, त्यातली ४ भाषणे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे पुलंचे हे लिखाण त्यांचे सुरुवातीचे लिखाण आहे. एका नव्या लेखकाचा अननुभवीपणा त्यात अगदी स्पष्ट दिसतो. पुलं ज्या विनोदासाठी ओळखले जातात तो सहज नि स्वाभाविक विनोद या पुस्तकात जवळपास नाहीच असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. या पुस्तकातले सगळेच विनोद हे अगदी ओढूनताणून केल्यासारखे वाटतात. एका होतकरू लेखकाची छाप या पुस्तकातल्या प्रत्येक लेखावर अगदी स्पष्ट दिसते. 'नाटक कसे बसवतात' आणि 'पानवाला' हे लेख सोडले तर बाकीचे सगळे लेख हे काही सांगण्यासारखे किंवा लिहिण्यासारखे आहे या कारणापेक्षा एक विनोदी लेख लिहायचा म्हणूनच लिहिल्यासारखे वाटतात.
तसे असेल तर असो! पण या लेखाचा उद्देश काय हा प्रश्न उरतोच – 'पुलंच्या एका पुस्तकातले दोष दाखवणे' हा? नाही, उद्देश आहे 'अपयशाने खचून न जाता नेटाने पुढे जात रहावे' हा संदेश वाचकांना देणे. मला वाटते हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. काम कुठलेही असो, दर वेळी त्यात यश मिळेलच असे नाही, आपण प्रयत्न करीत राहणे महत्वाचे. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तरीही निराश न होता 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करीत रहायला हवे. आपल्या भाईकाकांनी हेच केले. आपले पहिले नाटक पडले आणि दुसरे पुस्तकही लोकांना फारसे आवडले नाही हे दिसूत असूनही त्यांनी नेटाने आपले काम सुरुच ठेवले. 'कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा मात्र लोकांना हसवण्याचा धंदा' हे पुलंच्या जगण्याचे सूत्र होते नि त्यांनी ते आयुष्यभर कसोशीने पाळले. अर्थात विनोदी लेखक एवढीच पुलंची ओळख नाही, जीवन म्हणजे काय आणि ते त्याची गोडी चाखत कसे जगावे हे त्यांनीच आपल्याला सांगितले. आपल्याला खाण्यावर, गाण्यावर, सुंदर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं ते त्यांनीच. एकूणच आयुष्य रसिकतेने कसं जगावं हे आपल्याला दाखवून दिलं ते त्यांनीच.
'खोगीरभरती'सारखे पुस्तक लिहिणा-या या पुलंनीच पुढे 'बटाट्याची चाळ', 'खिल्ली', 'उरलंसुरलं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अजरामर पुस्तके आणि 'तुझे आहे तुजपाशी','ती फुलराणी' यांसारखी नाटके लिहून मराठीजनांना वेडे केले हे लक्षात घेतले तर आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे!
Thursday, November 25, 2010
भारतीय लोकशाही अमर रहे!
नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सर्वसामान्य जनता काय, भल्याभल्या निवडणूक तज्ञांनाही या निकालाने तोंडात बोटे घालायला लावली. १/२ नव्हे, २/३ नव्हे, ३/४ही नव्हे तर तब्बल ५/६ बहुमत नितीशकुमारांनी मिळवले, आपल्याला एवढा मोठा विजय मिळेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल! स्वातंत्र्यापासून खितपत पडलेला बिहार आज ख-या अर्थाने स्वातंत्र्याची वाट चालू लागला आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये!
नितीशकुमारांचा हा विजय विकासाच्या आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीच्या मुद्द्यांवर आहे आणि यासाठी आपण बिहारी जनतेचे अभिनंदन करायला हवे. बिहारी जनतेला आपण दोष देत असलो तरी वस्तुस्थिती तशी नाही; आत्तापर्यंत परिस्थितीच अशी होती की त्यांच्या हाती करण्यासारखे काही नव्हते. इकडे आड नि तिकडे विहीर अशी दर निवडणुकीत त्यांची स्थिती होत असताना त्यांना दोष कसा देणार? पण जर कुणी काम करीत असेल तर जातीपातीचे राजकारण विसरून आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि यासाठी खरोखरच त्यांची पाठ थोपटायला हवी.
याचबरोबर हेही स्पष्ट आहे की हा लालूंचा नि गांधी द्विकुटाचाही पराभव आहे. जातीपातीचे किळसवाणे राजकारण करणारे आणि बिहारला ५० वर्षे मागे नेणारे लालूं यादव यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीच गोष्ट राहुल गांधींची. काँग्रेसने कितीही नाकारले तरी हा त्यांचा सरळसरळ पराभव आहे यात काय शंका? अनेक महत्वाच्या मुद्यांवर बिहारचा लक्षणीय विकास झालेला दिसत असूनही राहुल गांधीनी ही बाब मान्य केली नाही; याउलट बिहारमधे जो काही थोडाफार विकास झाला आहे तो केंद्रामुळेच अशी खोटी बतावणी त्यांनी केली. अरे वा रे वा! विकास झाला नाही की तो स्थानिक राजकारण्यांमुळे नि तो झाला की केंद्रामुळे? हा कुठला न्याय? आपण केवळ आपल्या करिष्याच्या जोरावर लोकांना जास्त वेळ गुंतवून ठेवू शकत नाही हे राहुल गांधींनी मान्य करावे आणि नुस्ती भाषणे करण्यापेक्षा विकासकामांकडे जास्त लक्ष द्यावे.
आता महत्वाचा प्रश्न! महाराष्ट्रात असे घडेल काय? याचे उत्तर सोपे आहे, अर्थातच नाही! आपण कितीही म्हटले तरी जातींचे राजकारण अजूनही महाराष्ट्रात चालू आहेच; मराठी माणूस बोलतो बराच, पण वेळ आली की आपल्या जातीतल्या माणसालाच मत देतो हे पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे. नितीशकुमारांसारखा कुठलाही जाती-आधार नसलेला नेता मुख्यमंत्री होणे ही बाब महाराष्ट्रात तरी अशक्य आहे. याशिवाय नितीशकुमारांसारखा कर्तबगार कुणी नेताही विरोधी पक्षाकडे नसणे हाही मुद्दा आहेच. म्हणजे सत्ता काँग्रेस आघाडीकडून काढायची, पण द्यायची कुणाला? गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना? या कारणामुळे बिचारा मराठी मतदार 'दगडापेक्षा वीट मऊ' असे म्हणत पुन्हा आघाडीलाच संधी देतो हे आपण मागे पाहिले आहेच.
ते असेल ते असो, पण बिहारमधल्या या निवडणुक निकालाने सगळ्या जगाला भारतातल्या लोकशाहीची एक चु़णूक दाखवली आहे आणि माझ्या मते हेच सगळ्यात महत्वाचे आहे! भारतीय लोकशाही अमर रहे!
नितीशकुमारांचा हा विजय विकासाच्या आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीच्या मुद्द्यांवर आहे आणि यासाठी आपण बिहारी जनतेचे अभिनंदन करायला हवे. बिहारी जनतेला आपण दोष देत असलो तरी वस्तुस्थिती तशी नाही; आत्तापर्यंत परिस्थितीच अशी होती की त्यांच्या हाती करण्यासारखे काही नव्हते. इकडे आड नि तिकडे विहीर अशी दर निवडणुकीत त्यांची स्थिती होत असताना त्यांना दोष कसा देणार? पण जर कुणी काम करीत असेल तर जातीपातीचे राजकारण विसरून आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि यासाठी खरोखरच त्यांची पाठ थोपटायला हवी.
याचबरोबर हेही स्पष्ट आहे की हा लालूंचा नि गांधी द्विकुटाचाही पराभव आहे. जातीपातीचे किळसवाणे राजकारण करणारे आणि बिहारला ५० वर्षे मागे नेणारे लालूं यादव यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीच गोष्ट राहुल गांधींची. काँग्रेसने कितीही नाकारले तरी हा त्यांचा सरळसरळ पराभव आहे यात काय शंका? अनेक महत्वाच्या मुद्यांवर बिहारचा लक्षणीय विकास झालेला दिसत असूनही राहुल गांधीनी ही बाब मान्य केली नाही; याउलट बिहारमधे जो काही थोडाफार विकास झाला आहे तो केंद्रामुळेच अशी खोटी बतावणी त्यांनी केली. अरे वा रे वा! विकास झाला नाही की तो स्थानिक राजकारण्यांमुळे नि तो झाला की केंद्रामुळे? हा कुठला न्याय? आपण केवळ आपल्या करिष्याच्या जोरावर लोकांना जास्त वेळ गुंतवून ठेवू शकत नाही हे राहुल गांधींनी मान्य करावे आणि नुस्ती भाषणे करण्यापेक्षा विकासकामांकडे जास्त लक्ष द्यावे.
आता महत्वाचा प्रश्न! महाराष्ट्रात असे घडेल काय? याचे उत्तर सोपे आहे, अर्थातच नाही! आपण कितीही म्हटले तरी जातींचे राजकारण अजूनही महाराष्ट्रात चालू आहेच; मराठी माणूस बोलतो बराच, पण वेळ आली की आपल्या जातीतल्या माणसालाच मत देतो हे पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे. नितीशकुमारांसारखा कुठलाही जाती-आधार नसलेला नेता मुख्यमंत्री होणे ही बाब महाराष्ट्रात तरी अशक्य आहे. याशिवाय नितीशकुमारांसारखा कर्तबगार कुणी नेताही विरोधी पक्षाकडे नसणे हाही मुद्दा आहेच. म्हणजे सत्ता काँग्रेस आघाडीकडून काढायची, पण द्यायची कुणाला? गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना? या कारणामुळे बिचारा मराठी मतदार 'दगडापेक्षा वीट मऊ' असे म्हणत पुन्हा आघाडीलाच संधी देतो हे आपण मागे पाहिले आहेच.
ते असेल ते असो, पण बिहारमधल्या या निवडणुक निकालाने सगळ्या जगाला भारतातल्या लोकशाहीची एक चु़णूक दाखवली आहे आणि माझ्या मते हेच सगळ्यात महत्वाचे आहे! भारतीय लोकशाही अमर रहे!
Wednesday, October 20, 2010
एका कार्यक्रमाचा मृत्यु!
दूरदर्शन पडद्यावर एक काळ गाजवलेल्या, आपल्या वेळी प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकसंख्येचे नवनविन विक्रम करणा-या एका कार्यक्रमाचा गेल्या सोमवारी तडकाफडकी मृत्यु झाला, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. बरोबर! 'कौन बनेगा करोडपती' हाच तो कार्यक्रम. सध्या सुरू असलेला कार्यक्रम हा मूळ कार्यक्रमाचे भूत आहे नि त्याचे उथळ स्वरूप पहाता त्याला 'कौन बनेगा मेरा पती' असे एखादे सवंग नावच शोभून दिसेल असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही काय म्हणता?
केबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत!
पण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख! हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले! अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार? अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.
या नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा! सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते? तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे! आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती! कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह! ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल? हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा! हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला!
अमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले! हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात?
भारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं?
केबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत!
पण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख! हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले! अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार? अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.
या नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा! सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते? तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे! आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती! कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह! ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल? हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा! हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला!
अमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले! हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात?
भारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं?
Thursday, October 14, 2010
या ’बडे खॉं’ना कुणीतरी आवरा...
आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट नि विविध वाहिन्यांवर दिसणा-या जाहिराती पाहून या देशात १९६५ नंतर कुणी नविन बाळ जन्मालाच आले नाही असे एखाद्याला वाटले तर मी त्याला दोष देणार नाही. मला तरी असेच वाटते बुवा! आपली मुलगी शोभेल अशा वयाच्या तरूणीला चिठ्ठ्या पाठवणारा शाहरूख, आपल्या मित्राची धाकटी मुलगी शोभेल अशा दिपिकासोबत गाणी गाणारा सैफ आणि आपल्या तरूण मेव्हणीसारख्या दिसणा-या असीनबरोबर इष्कबाजी करणारा अमीर पाहून आणखी काय वाटावे?
म्हणजे मी या खानांच्या विरोधात नाही, एक शाहरूख खान सोडला तर बाकीच्या दोन खानांविषयी माझे मत चांगलेच आहे. अमीर खान एक चांगला, चोखंदळ अभिनेता आहे आणि सैफ अली खानचा तर मी काही वर्षांपुर्वी चक्क एक चाहता होतो. (आठवा ते 'नीला दुपट्टा पीला सूट...' गाणे) पण मला वाटते आता खरेच 'बास!' असे म्हणायची वेळ आली आहे. ह्यांना अजून किती सहन करायचे? आणि का? म्हणजे ह्या खानांचे वय वाढले याबाबत माझी तक्रार नाही. तुम्ही जन्माला आलात त्याअर्थी तुमचे वय हे वाढणारच. माझा आक्षेप आहे ह्या खानांनी तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यावर. शाहरूख खानची 'फौजी'ही मालिका आल्याला आता जवळजवळ दोन दशके होऊन गेली. तेव्हाचा नि आजचा शाहरूख यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्याचे चाहतेही मान्य करतील. कुठे तो रसरशीत चेहे-याचा शाहरूख आणि कुठे आजचा थकलेला नि डोळ्यातली चमक हरवलेला शाहरूख. त्या जाहिरातीत झोपलेल्या टिनाच्या खोलीत कागदाचे बोळे फेकताना पाहून त्याला विचारावेसे वाटते, 'काय लिहिलेयेस त्यात? टिना, उद्या माझी मुलगी तुझ्याबरोबर येणार आहे, तिला न घेता कॉलेजला जाउ नकोस हो!' हेच ना? आमीरचीही तीच गत. आठवा तो 'अंदाज अपना अपना' मधला 'आयला...' म्हणणारा कोवळा आमीर नि त्या तुलनेत आजचा 'थ्री इडियटस्'मधला निबर आमीर. आणि सैफबाबत काय म्हणावे? 'मै खिलाडी तू अनाडी'मधल्या सैफला कोवळी काकडी म्हटले तर आजच्या सैफला दुधी भोपळा म्हणावे लागेल! एका नविन जाहिरातीत दाढी वाढवलेला सैफ करिनाच्या मागे पळताना पाहून मला तर असे वाटते की एखादा गुंडच तिच्या मागे लागला आहे!
या अभिनेत्यांनी सिनेमासृष्टीत रहावे, वेगवेगळ्या भूमिकाही कराव्यात, पण आपले वाढते वय लक्षात घेता त्यांमधे बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला नको का? जीवननदी पुढेपुढे जात असताना हे अभिनेते मात्र आजही नदीकाठच्या झाडाची मुळे पकडून एकाच जागी उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, हे हास्यास्पदच नाही का? अर्थात् आपण आता तरूण राहिलो नाही हे मान्य करायला नि आपल्या भुमिकांमधे बदल करायला विलक्षण धैर्य लागते, या अभिनेत्यांकडे ते आहे का?
हे झाले या अभिनेत्यांचे वागणे, पण मी म्हणतो ह्या जाहिराती नि हे चित्रपट बनवण-यांनी तरी डोके वापरावे की नाही! हे नट काय, पैसे मिळवायलाच बसले आहेत, पण या लोकांनी त्यांना का घ्यावे? यांच्याकडे पर्याय कमी आहेत का? इम्रान हाश्मी आहे, रणबीर कपूर आहे, शाहिद कपूर आहे आणि यांपैकी कुणी तयार नसेल तर सगळ्यांचा आवडता हिमेश रेशमिया आहे, त्याला घ्या नि करा की हव्या तेवढ्या जाहिराती नि सिनेमे! पण जनतेला म्हातारचाळे आवडतात असा गैरसमज करून घेतलेल्या या लोकांना कोण समजवणार?
अरे कुणी आहे का तिकडे? जमल्यास या 'बडे खॉं'ना आवर घाला रे!
म्हणजे मी या खानांच्या विरोधात नाही, एक शाहरूख खान सोडला तर बाकीच्या दोन खानांविषयी माझे मत चांगलेच आहे. अमीर खान एक चांगला, चोखंदळ अभिनेता आहे आणि सैफ अली खानचा तर मी काही वर्षांपुर्वी चक्क एक चाहता होतो. (आठवा ते 'नीला दुपट्टा पीला सूट...' गाणे) पण मला वाटते आता खरेच 'बास!' असे म्हणायची वेळ आली आहे. ह्यांना अजून किती सहन करायचे? आणि का? म्हणजे ह्या खानांचे वय वाढले याबाबत माझी तक्रार नाही. तुम्ही जन्माला आलात त्याअर्थी तुमचे वय हे वाढणारच. माझा आक्षेप आहे ह्या खानांनी तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यावर. शाहरूख खानची 'फौजी'ही मालिका आल्याला आता जवळजवळ दोन दशके होऊन गेली. तेव्हाचा नि आजचा शाहरूख यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्याचे चाहतेही मान्य करतील. कुठे तो रसरशीत चेहे-याचा शाहरूख आणि कुठे आजचा थकलेला नि डोळ्यातली चमक हरवलेला शाहरूख. त्या जाहिरातीत झोपलेल्या टिनाच्या खोलीत कागदाचे बोळे फेकताना पाहून त्याला विचारावेसे वाटते, 'काय लिहिलेयेस त्यात? टिना, उद्या माझी मुलगी तुझ्याबरोबर येणार आहे, तिला न घेता कॉलेजला जाउ नकोस हो!' हेच ना? आमीरचीही तीच गत. आठवा तो 'अंदाज अपना अपना' मधला 'आयला...' म्हणणारा कोवळा आमीर नि त्या तुलनेत आजचा 'थ्री इडियटस्'मधला निबर आमीर. आणि सैफबाबत काय म्हणावे? 'मै खिलाडी तू अनाडी'मधल्या सैफला कोवळी काकडी म्हटले तर आजच्या सैफला दुधी भोपळा म्हणावे लागेल! एका नविन जाहिरातीत दाढी वाढवलेला सैफ करिनाच्या मागे पळताना पाहून मला तर असे वाटते की एखादा गुंडच तिच्या मागे लागला आहे!
या अभिनेत्यांनी सिनेमासृष्टीत रहावे, वेगवेगळ्या भूमिकाही कराव्यात, पण आपले वाढते वय लक्षात घेता त्यांमधे बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला नको का? जीवननदी पुढेपुढे जात असताना हे अभिनेते मात्र आजही नदीकाठच्या झाडाची मुळे पकडून एकाच जागी उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, हे हास्यास्पदच नाही का? अर्थात् आपण आता तरूण राहिलो नाही हे मान्य करायला नि आपल्या भुमिकांमधे बदल करायला विलक्षण धैर्य लागते, या अभिनेत्यांकडे ते आहे का?
हे झाले या अभिनेत्यांचे वागणे, पण मी म्हणतो ह्या जाहिराती नि हे चित्रपट बनवण-यांनी तरी डोके वापरावे की नाही! हे नट काय, पैसे मिळवायलाच बसले आहेत, पण या लोकांनी त्यांना का घ्यावे? यांच्याकडे पर्याय कमी आहेत का? इम्रान हाश्मी आहे, रणबीर कपूर आहे, शाहिद कपूर आहे आणि यांपैकी कुणी तयार नसेल तर सगळ्यांचा आवडता हिमेश रेशमिया आहे, त्याला घ्या नि करा की हव्या तेवढ्या जाहिराती नि सिनेमे! पण जनतेला म्हातारचाळे आवडतात असा गैरसमज करून घेतलेल्या या लोकांना कोण समजवणार?
अरे कुणी आहे का तिकडे? जमल्यास या 'बडे खॉं'ना आवर घाला रे!
Wednesday, October 13, 2010
’महाराष्ट्र देशा’ - उद्धव ठाकरेंचे देखणे पुस्तक
या शनिवारी आचार्य अत्रे सभागृहावरून जाताना एका पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात नि त्यांचा 'सरसकट २०% सूट' असा फलक पाहिला नि क्षणभर थबकलो. हाताशी थोडा वेळ होता, तेव्हा आत गेलोही. खरेतर या पुस्तक प्रदर्शनांमधे वेगळे काही नसते. आचार्य अत्रे सभागृहात होणारी ही प्रदर्शने तर आता मला पाठ झाल्यासारखी झाली आहेत. बाहेर दिवाळी अंक नि फुटकळ पुस्तके, आत गेल्यावर पहिल्यांदा इंग्रजीतून अनुवादित झालेली मराठी पुस्तके, नंतर आचार्य अत्रे नि पु ल देशपांडे ह्यांची पुस्तके, त्यापुढे कथासंग्रह, परचुरे प्रकाशनवाल्यांचे एक टेबल, मधे काही बालपुस्तके नि मग शेवटी इंग्रजी पुस्तके असे या प्रदर्शनांचे साधारण स्वरूप असते. पण असे असले तरी मी इथे आवर्जून जातो आणि नाही म्हटले तरी ३००/४०० रुपयांची खरेदी होतेच.
यावेळीही असाच आत गेलो नि आत शिरताक्षणीच माझे लक्ष वेधून घेतले एका लंब्याचवड्या पुस्तकाने. 'पाहूया तरी खरे' असे म्हणत ते पुस्तक मी हातात घेतले नि क्षणार्धात त्यात गुंतून गेलो. पुस्तक होतेच तसे. महाराष्ट्रातले गड, धार्मिक स्थळे आणि इतर प्रसिद्ध वास्तू यांची आकाशातून घेतलेली छायाचित्रे असे त्याचे स्वरूप होते. या सा-या छायाचित्रांचे छायाचित्रक होते शिवसेना नेते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचे हवाई चित्रण करणारे असे पुस्तक मी मराठीत काय, इंग्रजीतही कधी पाहिले नव्हते. पुस्तकाची किंमतही फारच माफक म्हणजे फक्त १०० रुपये होती, तेव्हा ते लगेच विकत घेतलेही.
सुमारे १०० पानांच्या ह्या सुंदर पुस्तकाचे वाचन पूर्ण करूनच आता हा लेख लिहितो आहे. प्रत्येक पानावर एक छायाचित्र नि त्याशेजारी त्यावरची छोटी टिप्पणी अशी पुस्तकाची साधारण मांडणी आहे. पुस्तकातली काही (७ ते ८) चित्रे आपल्याला ओळखीची वाटतात कारण आपण ती पुर्वी पाहिलेली आहेत. बरोबर, काही वर्षांपुर्वी महाजालावर ढकलपत्रांच्या स्वरूपात फिरत असलेली गडचित्रे ती हीच. पण अशी चित्रे फारच थोडी; पुस्तकातली बहुसंख्य चित्रे नविन (निदान मला तरी) आहेत. पुस्तकाचे लगेचच जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दर्जा; तो खरोखरच उत्कृष्ट आहे. गुळगुळीत पाने आणि त्यावरची प्रत्येक बारकावा जिवंत करणारी सुबक छपाई यामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झाले आहे. मी तर म्हणेन, मी पाहिलेल्या अशा परदेशी पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा दर्जा तसूभरही कमी नाही. मराठी पुस्तकांचा तांत्रिक दर्जा चांगला नसल्याचे रडगाणे गाणा-यांना निदान हे पुस्तक न वाचण्यासाठी तरी हे कारण पुढे करता येणार नाही!
आता थोडेसे पुस्तकाचे मुख्य आकर्षण असलेल्या त्यातल्या छायचित्रांविषयी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल अनेकांची वेगवेगळी मते असली तरी सदर छायाचित्रांवरून ते एक उत्कृष्ट छायाचित्रणकार आहेत याबाबत एकवाक्यता होण्यास हरकत नसावी. छायाचित्रे आकाशातून काढल्यावर ती चांगली येणारच असे काही जण म्हणतील, मी मात्र त्यांच्याशी सहमत होणार नाही. प्रत्येक छायाचित्राचा कोन(Framing), चौकट निवडण्याची पद्धत(Composition), त्याची स्पष्टता(Sharpness), त्यातली रंगसंगती(Combination of colors) या सा-या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी काढलेली छायाचित्रे पैकीच्यापैकी गुण मिळवतात. अर्थात् ही छायाचित्रे आपल्या आपुलकीचा विषय असलेले किल्ले नि आपल्या परिचयाची प्रसिद्ध स्थळे यांचे एका वेगळ्या दृष्टीने चित्रण करणारी असल्याने आपल्याला अधिक जवळची वाटतात हेही खरे. पण या पुस्तकात फक्त प्रसिद्ध जागांचीच चित्रे नाहीत, नांगर धरणारे शेतकरी, भातलागवड करणारे मजूर, तलावात डुंबणा-या गाई आणि घाटाघाटांमधले रस्ते अशी काही चित्रेही त्यात आहेत. पेंटिंग नि छायाचित्र यातील सीमारेषा धूसर करणारे छायाचित्र ते सर्वोत्तम छायाचित्र असे मानले तर या पुस्तकातली बरीचशी छायाचित्रे ही अट नेमकेपणाने पूर्ण करताना दिसतात. किना-यावर विश्रांती घेणा-या बोटींचं किंवा नाना रंगांची खाचरं दाखवणारं चित्र ही याची उत्तम उदाहरणे.
महाराष्ट्रातले डोंगर, नद्या, मंदिरे नि दर्ये यांवर प्रेम करणा-यांबरोबरच छायाचित्रणाचा छंद असलेल्या व्यक्तींनाही आवडेल असे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राचे चित्ररूप दर्शन आपल्या वाचकांना घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या पुस्तकातून केला आहे आणि माझ्या मते ते त्यात १००% टक्के यशस्वी झाले आहेत. खिशाला परवडणारे असल्यामुळे, ते विकत घेण्यासही काही अडचण नाही. मी तर म्हणेन, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी घरात हे पुस्तक असायलाच हवे!
महाराष्ट्र देशा
उद्धव ठाकरे
प्रबोधन प्रकाशन
सहावी आवृत्ती (१६ ऑगस्ट २०१०)
मूल्य : रू. १०० फक्त
ता.क. 'सरसकट २०% सूट'असा फलक 'शुभम साहित्य'ने या प्रदर्शनात लावला असला तरी या पुस्तकावर मात्र त्यांनी फक्त १० टक्केच सूट दिली. हा प्रकार लक्षात घेता पैसे देताना आपले बील व्यवस्थित तपासून घेणे उत्तम!
यावेळीही असाच आत गेलो नि आत शिरताक्षणीच माझे लक्ष वेधून घेतले एका लंब्याचवड्या पुस्तकाने. 'पाहूया तरी खरे' असे म्हणत ते पुस्तक मी हातात घेतले नि क्षणार्धात त्यात गुंतून गेलो. पुस्तक होतेच तसे. महाराष्ट्रातले गड, धार्मिक स्थळे आणि इतर प्रसिद्ध वास्तू यांची आकाशातून घेतलेली छायाचित्रे असे त्याचे स्वरूप होते. या सा-या छायाचित्रांचे छायाचित्रक होते शिवसेना नेते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचे हवाई चित्रण करणारे असे पुस्तक मी मराठीत काय, इंग्रजीतही कधी पाहिले नव्हते. पुस्तकाची किंमतही फारच माफक म्हणजे फक्त १०० रुपये होती, तेव्हा ते लगेच विकत घेतलेही.
सुमारे १०० पानांच्या ह्या सुंदर पुस्तकाचे वाचन पूर्ण करूनच आता हा लेख लिहितो आहे. प्रत्येक पानावर एक छायाचित्र नि त्याशेजारी त्यावरची छोटी टिप्पणी अशी पुस्तकाची साधारण मांडणी आहे. पुस्तकातली काही (७ ते ८) चित्रे आपल्याला ओळखीची वाटतात कारण आपण ती पुर्वी पाहिलेली आहेत. बरोबर, काही वर्षांपुर्वी महाजालावर ढकलपत्रांच्या स्वरूपात फिरत असलेली गडचित्रे ती हीच. पण अशी चित्रे फारच थोडी; पुस्तकातली बहुसंख्य चित्रे नविन (निदान मला तरी) आहेत. पुस्तकाचे लगेचच जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दर्जा; तो खरोखरच उत्कृष्ट आहे. गुळगुळीत पाने आणि त्यावरची प्रत्येक बारकावा जिवंत करणारी सुबक छपाई यामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झाले आहे. मी तर म्हणेन, मी पाहिलेल्या अशा परदेशी पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा दर्जा तसूभरही कमी नाही. मराठी पुस्तकांचा तांत्रिक दर्जा चांगला नसल्याचे रडगाणे गाणा-यांना निदान हे पुस्तक न वाचण्यासाठी तरी हे कारण पुढे करता येणार नाही!
आता थोडेसे पुस्तकाचे मुख्य आकर्षण असलेल्या त्यातल्या छायचित्रांविषयी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल अनेकांची वेगवेगळी मते असली तरी सदर छायाचित्रांवरून ते एक उत्कृष्ट छायाचित्रणकार आहेत याबाबत एकवाक्यता होण्यास हरकत नसावी. छायाचित्रे आकाशातून काढल्यावर ती चांगली येणारच असे काही जण म्हणतील, मी मात्र त्यांच्याशी सहमत होणार नाही. प्रत्येक छायाचित्राचा कोन(Framing), चौकट निवडण्याची पद्धत(Composition), त्याची स्पष्टता(Sharpness), त्यातली रंगसंगती(Combination of colors) या सा-या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी काढलेली छायाचित्रे पैकीच्यापैकी गुण मिळवतात. अर्थात् ही छायाचित्रे आपल्या आपुलकीचा विषय असलेले किल्ले नि आपल्या परिचयाची प्रसिद्ध स्थळे यांचे एका वेगळ्या दृष्टीने चित्रण करणारी असल्याने आपल्याला अधिक जवळची वाटतात हेही खरे. पण या पुस्तकात फक्त प्रसिद्ध जागांचीच चित्रे नाहीत, नांगर धरणारे शेतकरी, भातलागवड करणारे मजूर, तलावात डुंबणा-या गाई आणि घाटाघाटांमधले रस्ते अशी काही चित्रेही त्यात आहेत. पेंटिंग नि छायाचित्र यातील सीमारेषा धूसर करणारे छायाचित्र ते सर्वोत्तम छायाचित्र असे मानले तर या पुस्तकातली बरीचशी छायाचित्रे ही अट नेमकेपणाने पूर्ण करताना दिसतात. किना-यावर विश्रांती घेणा-या बोटींचं किंवा नाना रंगांची खाचरं दाखवणारं चित्र ही याची उत्तम उदाहरणे.
महाराष्ट्रातले डोंगर, नद्या, मंदिरे नि दर्ये यांवर प्रेम करणा-यांबरोबरच छायाचित्रणाचा छंद असलेल्या व्यक्तींनाही आवडेल असे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राचे चित्ररूप दर्शन आपल्या वाचकांना घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या पुस्तकातून केला आहे आणि माझ्या मते ते त्यात १००% टक्के यशस्वी झाले आहेत. खिशाला परवडणारे असल्यामुळे, ते विकत घेण्यासही काही अडचण नाही. मी तर म्हणेन, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी घरात हे पुस्तक असायलाच हवे!
महाराष्ट्र देशा
उद्धव ठाकरे
प्रबोधन प्रकाशन
सहावी आवृत्ती (१६ ऑगस्ट २०१०)
मूल्य : रू. १०० फक्त
ता.क. 'सरसकट २०% सूट'असा फलक 'शुभम साहित्य'ने या प्रदर्शनात लावला असला तरी या पुस्तकावर मात्र त्यांनी फक्त १० टक्केच सूट दिली. हा प्रकार लक्षात घेता पैसे देताना आपले बील व्यवस्थित तपासून घेणे उत्तम!
Wednesday, October 6, 2010
भारतातल्या दोन आनंददायी घटना
गेल्या काही दिवसात भारतात दोन आनंददायी घटना घडल्या. देशातली सध्याची परिस्थिती पाहून त्याचे काही खरे नाही असे वाटण्यासारखी वेळ आली होती खरी; सदर घटना मात्र मनाला आनंद देणा-या नि चला 'होत असलेले सगळेच काही निराशाजनक नाही' असा दिलासा देणा-या ठरल्या!
पहिली घटना म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला निकाल दिल्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त केलेली संयत प्रतिक्रिया नि करोडो भारतीयांनी त्यांना दिलेली साथ. हा निकाल देण्याआधी सरकारने मोठमोठ्या जाहिराती देऊन नि नागरिकांना भावनिक आवाहने करून असे काही वातावरण तयार केले होते की वाटावे त्या दिवशी जणु जगबुडीच होणार आहे! मला तर असे वाटत होते की क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला की आनंद साजरा करण्यासाठी आतूर झालेले नागरिक जसे घराबाहेर पळतात नि फटाके फोडतात अगदी तसेच न्यायालयात न्यायाधीशांनी निकाल वाचताक्षणीच लोक बाहेर पडतील नि गोळीबार सुरू करतील. पण सुदैवाने असे काही घडले नाही! १९९२ सालच्या नि आजच्या भारतात पडलेला मोठा फरक हे असे होण्यामागचे महत्वाचे कारण. धर्माच्या छत्रीखाली भारतीय तरूणांना गोळा करणे सोपे नाही हे सा-याच चतुर राजकरण्यांना नि धार्मिक नेत्यांना आता कळून चुकलेले आहे. लोक आता ह्दयाऐवजी डोक्याने विचार करू लागले आहेत हे त्यांना समजले आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे नि अशा घटनांमधे आपली उर्जा वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही हे भारतीयांना (विशेषतः तरूणांना) पटते आहे. आमचा तिरस्कार नि द्वेषापेक्षा प्रेम नि बंधुभावावर अधिक विश्वास आहे हे भारतीय तरूणांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे नि मला वाटते याबद्दल आपण त्यांचे कौतुक करायला हवे.
दुसरी घटना म्हणजे नवी दिल्ली येथे झालेले 'राष्ट्रकुल स्पर्धांचे' दिमाखदार उद्घाटन. ही स्पर्धा भारताकडे यजमानपद आल्यापासून फक्त नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत राहिलेली होती. स्पर्धेसाठीची स्टेडीयम्स वेळेत तयार होतील की नाही हा प्रश्न, त्यांच्या दर्जाबाबतचा प्रश्न, खेळाडू राहणार आहेत त्या इमारतींच्या दर्जाचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न असे सारे प्रश्न पुन्हापुन्हा विचारले जात होते. त्यातच या स्पर्धेतून काही नामवंत खेळाडूंनी माघार घेणे, स्पर्धेसाठीचा पादचारी पूल पडणे, खेळाडूनिवासात साप सापडणे अशा घटना घडल्या नि स्पर्धेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परदेशी माध्यमे तर या स्पर्धा रद्दच होणार आहेत (किंवा व्हाव्यात) असेच चित्र जगासमोर मांडत होती, पण तसे काही घडले नाही. डोळ्यांचे पारणे फेडील अशा दिलखेचक नि चित्ताकर्षक सोहळ्याने या स्पर्धेचे उद्घाटन झाले नि 'ज्याचा शेवट गोड ते सारे गोड' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. या सोहळ्यात मला व्यक्तिश: आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे बॉलीवूडचा कमीत कमी सहभाग नि कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा झालेला प्रयत्न. अर्थात हा सोहळा यशस्वी झाला म्हणून आपले सारे गुन्हे माफ या भ्रमात कलमाडी व कंपनी यांनी राहू नये. त्यांच्या वागण्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल नि जर तो मिळाला नाही तर जनतेने तो त्यांच्याकडून मागून घ्यायला हवा.
ता.क. : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेकडे वळून पाहताना एका माजी कारसेवकाच्या मनात आलेले विचार येथे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms] वाचता येतील.
पहिली घटना म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला निकाल दिल्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त केलेली संयत प्रतिक्रिया नि करोडो भारतीयांनी त्यांना दिलेली साथ. हा निकाल देण्याआधी सरकारने मोठमोठ्या जाहिराती देऊन नि नागरिकांना भावनिक आवाहने करून असे काही वातावरण तयार केले होते की वाटावे त्या दिवशी जणु जगबुडीच होणार आहे! मला तर असे वाटत होते की क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला की आनंद साजरा करण्यासाठी आतूर झालेले नागरिक जसे घराबाहेर पळतात नि फटाके फोडतात अगदी तसेच न्यायालयात न्यायाधीशांनी निकाल वाचताक्षणीच लोक बाहेर पडतील नि गोळीबार सुरू करतील. पण सुदैवाने असे काही घडले नाही! १९९२ सालच्या नि आजच्या भारतात पडलेला मोठा फरक हे असे होण्यामागचे महत्वाचे कारण. धर्माच्या छत्रीखाली भारतीय तरूणांना गोळा करणे सोपे नाही हे सा-याच चतुर राजकरण्यांना नि धार्मिक नेत्यांना आता कळून चुकलेले आहे. लोक आता ह्दयाऐवजी डोक्याने विचार करू लागले आहेत हे त्यांना समजले आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे नि अशा घटनांमधे आपली उर्जा वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही हे भारतीयांना (विशेषतः तरूणांना) पटते आहे. आमचा तिरस्कार नि द्वेषापेक्षा प्रेम नि बंधुभावावर अधिक विश्वास आहे हे भारतीय तरूणांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे नि मला वाटते याबद्दल आपण त्यांचे कौतुक करायला हवे.
दुसरी घटना म्हणजे नवी दिल्ली येथे झालेले 'राष्ट्रकुल स्पर्धांचे' दिमाखदार उद्घाटन. ही स्पर्धा भारताकडे यजमानपद आल्यापासून फक्त नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत राहिलेली होती. स्पर्धेसाठीची स्टेडीयम्स वेळेत तयार होतील की नाही हा प्रश्न, त्यांच्या दर्जाबाबतचा प्रश्न, खेळाडू राहणार आहेत त्या इमारतींच्या दर्जाचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न असे सारे प्रश्न पुन्हापुन्हा विचारले जात होते. त्यातच या स्पर्धेतून काही नामवंत खेळाडूंनी माघार घेणे, स्पर्धेसाठीचा पादचारी पूल पडणे, खेळाडूनिवासात साप सापडणे अशा घटना घडल्या नि स्पर्धेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परदेशी माध्यमे तर या स्पर्धा रद्दच होणार आहेत (किंवा व्हाव्यात) असेच चित्र जगासमोर मांडत होती, पण तसे काही घडले नाही. डोळ्यांचे पारणे फेडील अशा दिलखेचक नि चित्ताकर्षक सोहळ्याने या स्पर्धेचे उद्घाटन झाले नि 'ज्याचा शेवट गोड ते सारे गोड' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. या सोहळ्यात मला व्यक्तिश: आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे बॉलीवूडचा कमीत कमी सहभाग नि कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा झालेला प्रयत्न. अर्थात हा सोहळा यशस्वी झाला म्हणून आपले सारे गुन्हे माफ या भ्रमात कलमाडी व कंपनी यांनी राहू नये. त्यांच्या वागण्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल नि जर तो मिळाला नाही तर जनतेने तो त्यांच्याकडून मागून घ्यायला हवा.
ता.क. : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेकडे वळून पाहताना एका माजी कारसेवकाच्या मनात आलेले विचार येथे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms] वाचता येतील.
Subscribe to:
Posts (Atom)